कापूस दरात मोठी उसळी: हिंगणघाट, सिंदी-सेलूमध्ये ८००० चा टप्पा पार, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित!
कापूस दरात मोठी उसळी: हिंगणघाट, सिंदी-सेलूमध्ये ८००० चा टप्पा पार, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित!
Read More
राज्यात थंडीची लाट कायम! उद्या ‘या’ ६ जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा
राज्यात थंडीची लाट कायम! उद्या ‘या’ ६ जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा
Read More
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार!
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार!
Read More
डिसेंबर-जानेवारीचा अंदाज ; पहा तोडकर यांचा पुढील दोन-तीन महीन्याचा अंदाज
डिसेंबर-जानेवारीचा अंदाज ; पहा तोडकर यांचा पुढील दोन-तीन महीन्याचा अंदाज
Read More
उन्हाळी तीळ लागवड: कमी दिवसांत मिळेल भरघोस उत्पादन, मालामाल पिक
उन्हाळी तीळ लागवड: कमी दिवसांत मिळेल भरघोस उत्पादन, मालामाल पिक
Read More

१२ डिसेंबर २०२५: राज्यात थंडीची लाट कायम! या जिल्ह्यांमध्ये तापमान विक्रमी खाली

पुणे, अहमदनगर आणि विदर्भात कडाक्याची थंडी; १६ डिसेंबरपर्यंत तीव्र थंडीचा इशारा, पुढील आठवड्यात तीव्रता कमी होणार.

सध्याचे तापमान आणि थंडीची तीव्रता

सध्या राज्यात बऱ्याच ठिकाणी तीव्र थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत आहे. आज, ११ डिसेंबर रोजी सकाळच्या वेळेस सर्वात कमी तापमान जेऊर (करमाळा) येथे ५.५ अंश सेल्सिअस इतके, तर अहिल्यानगर (६.६°C), मोहळ (६.८°C) आणि पुणे शिवाजीनगर (७.९°C) इतके पाहायला मिळाले. गेल्या काही वर्षांत पुणे शहरात इतके कमी तापमान नोंदवले गेलेले नाही. सरासरी तुलनेत पाहिल्यास, राज्यातील सर्वच ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा खाली गेले आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे सध्या विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राकडे पोहोचत आहेत, ज्यामुळे वातावरण पूर्णपणे कोरडे आणि स्वच्छ आहे. स्वच्छ आकाशामुळे रात्रीच्या वेळेस ऊर्जा वेगाने वातावरणात बाहेर पडते (Radiation Cooling), परिणामी कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे.

ADS किंमत पहा ×

पुढील ४८ तासांतील जिल्ह्यांसाठी अंदाज

पुढील ४८ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा (ग्रामीण भाग), सोलापूर (ग्रामीण भाग) आणि अहमदनगर येथील ग्रामीण भागांमध्ये तापमान ७ अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी राहण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे आणि जळगावच्या ग्रामीण भागात तापमान ६ अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी राहील. मराठवाड्यात, छत्रपती संभाजीनगर, बीडचे उत्तरेकडील भाग, परभणी आणि हिंगोलीच्या ग्रामीण भागात तापमान ८ अंश सेल्सिअस पेक्षा कमी राहील. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळच्या ग्रामीण भागात तापमान ८ अंश सेल्सिअस पेक्षा कमी राहील. कोकण आणि किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान १० ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment