राष्ट्रीय खाद्य तेल अभियान २०२५ अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५० किलोपर्यंत बियाणे मिळणार.
योजनेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्ट
राष्ट्रीय खाद्य तेल अभियान २०२५ अंतर्गत राज्यातील तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. ३० जुलै २०२५ रोजी राज्यामध्ये ₹५ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीसह हे खाद्य तेल मिशन अभियान राबवण्यास मंजुरी देण्यात आली होती. या अभियानात सोयाबीन, तीळ, करडई, कारळ यांसारख्या विविध तेलबिया पिकांचा समावेश असून, उन्हाळी हंगामासाठी भुईमूग या पिकाची निवड करण्यात आली आहे.
अनुदान मर्यादा आणि बियाण्याची मात्रा
या योजनेत भुईमूग बियाण्यावर शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान दिले जात आहे. बियाण्याचा दर ₹११४ प्रति किलो निश्चित करण्यात आला आहे. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त एक हेक्टर (१५० किलो) मर्यादेत, तर कमीत कमी २० गुंठे (३० किलो) मर्यादेत अनुदान दिले जाईल. शेतकऱ्याला अर्ज केलेल्या क्षेत्राच्या प्रमाणानुसार बियाणे उपलब्ध करून दिले जाईल. बियाणे २० किलो आणि ३० किलोच्या पिशव्यांमध्ये उपलब्ध असेल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक पोर्टल आणि प्रक्रिया
१०० टक्के अनुदानावर भुईमूग बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. पोर्टलवरील ‘बी बियाणे आणि औषधे खाते’ या बाबी अंतर्गत शेतकऱ्यांना हा अर्ज करता येणार आहे.
या ८ जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याची संधी
भुईमूग बिकासाठी राज्याच्या ८ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. जर तुम्ही खालील जिल्ह्यांमध्ये असाल, तर तुम्ही या अनुदानासाठी अर्ज करू शकता:
-
कोल्हापूर
-
सांगली
-
सातारा
-
नाशिक
-
धुळे
-
पुणे
-
अहिल्यानगर (अहमदनगर)
-
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)



