गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
Read More
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
Read More
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
Read More
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
Read More
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
Read More

१ जुलैला होणार कर्जमाफी! बच्चू कडू यांचा मोठा एल्गार

चालू कर्ज माफ न केल्यास रेल्वेचे चाक धावू देणार नाही; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने निर्णयाची मागणी.

माजी मंत्र्यांचा सरकारला थेट इशारा

शेतकरी नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला थेट इशारा दिला आहे. जर सरकारने चालू कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही, तर १ जुलैपासून महाराष्ट्रातील रेल्वेच्या रुळांवर एकही चाक धावू दिले जाणार नाही. कडू यांनी थेट मुख्यमंत्र्यांना उद्देशून सांगितले की, चालू वर्षातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ न केल्यास, येणाऱ्या काळात शेतकरी पेरणी करू शकणार नाही आणि तो पुन्हा संकटात सापडेल.

चालू कर्जाची माफी का आवश्यक?

बच्चू कडू यांनी सभागृहात या मुद्द्यावर आवाज उचलला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री नेहमी सांगतात की दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी देत नाही, पण ज्या वर्षी दुष्काळ पडला, त्याच वर्षातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही. यावर्षी झालेल्या मोठ्या हानीमुळे (दुष्काळामुळे) अनेक शेतकऱ्यांचे पीक हाती आले नाही. अशा कर्जबाजारी शेतकऱ्यांना जर कर्जमाफीच्या कक्षेत घेतले नाही, तर त्या कर्जमाफीला अर्थ काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्याची परिस्थिती पाहता, आपत्ती व्यवस्थापन नियमानुसारही कर्जवसुली थांबवून कर्जमाफीचे धोरण स्वीकारणे आवश्यक आहे, असे कडू यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती बँकांची कोंडी

कडू यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या (DCCBs) अडचणींकडेही लक्ष वेधले आहे. एका बाजूला सरकारने एक वर्षासाठी कर्ज वसुलीस स्थगिती दिली आहे. दुसऱ्या बाजूला, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात नाहीये. यामुळे जिल्हा बँकांना चालू कर्ज वसूल करता येणार नाही आणि सरकारकडून थकबाकीची रक्कम न मिळाल्यास, पेरणीसाठी नवीन कर्ज कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर पात्र शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही, तर नवीन कर्ज मिळणार नाही आणि नवीन कर्ज मिळाले नाही, तर शेतकरी पेरणी करू शकणार नाही.

जुनी कर्जमाफीही प्रलंबित

मागील महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनांमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाही अद्याप कर्जाची रक्कम मिळाली नाहीये. त्यामुळे एका बाजूला शेतकरी पात्र ठरल्याने थकीतदार दिसत नाही, पण दुसरीकडे पैसे न आल्याने त्याच्यावर कर्जाचा बोजा कायम आहे. या सगळ्या किचकट कारभारावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अन्यथा होणाऱ्या एल्गार आंदोलनाची तयारी सुरू असल्याचा गंभीर इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

Leave a Comment